नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवशी एअर इंडियाचे विमान घेणार उड्डाण 
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवशी एअर इंडियाचे विमान घेणार उड्डाण

प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आता ७ ऑक्टोबरला उद‌्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी एअर इंडियाचे विमान येथे उड्डाण करेल.

Swapnil S

नवी मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आला. या विमानतळाचे उद‌्घाटन ३० सप्टेंबरला होणार होते, मात्र आता उद्घाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला असून ७ ऑक्टोबरला उद‌्घाटन होणार असल्याचे समजते. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी एअर इंडियाचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणार असल्याचे जाहीर झाले आहे.

एअर इंडिया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १५ शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला दररोज एअर इंडियाची २० विमाने नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी उड्डाण घेणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस श्रेणीतील ही विमाने असतील. पुढील वर्षापर्यंत विमान उड्डाणांची संख्या ४० वरून ५५ पर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये ५ आंतरराष्ट्रीय विमान सेवांचाही समावेश असेल. २०२६ च्या अखेरपर्यंत ही संख्या ६० पर्यंत वाढवण्याचाही कंपनीचा विचार आहे.

अकासा व इंडिगोही सुरू करणार सेवा

एअर इंडियाबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणखी दोन विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून त्यात अकासा एअर आणि इंडिगो या विमान कंपन्यांचा समावेश आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली