राजकीय

Rahul Gandhi: तीन राज्यांतील पराभवावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; पराभव स्वीकारत म्हणाले, "विचारधारेची लढाई..."

राहुल यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

नवशक्ती Web Desk

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी तीन राज्यात भापचा विजय तर काँग्रेसचा पराभव झाल्यात जमा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव स्विकारला आहे.

राहुल यांनी ट्विट करत आपली भुमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनादेश आम्ही नम्नपूर्वक स्वीकारतो. ही विचारधारेची लढाई मात्र सुरुच राहील, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

यासोबतच राहुल यांनी तेलंगणातील जनतेचे आभार मानले आहेत. सर्वसामान्यांचं सरकार स्थापन करण्याचं वचन आम्ही जरुर पूर्ण करु. सर्व कार्यकर्त्यांना त्यांची मेहनत आणि समर्थनासाठी मनापासून धन्यवाद देतो. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन