राजकीय

मांसाहार करुन केसीआर सोलापूरच्या दिशेने? अमोल मिटकरींच्या टीकेवर बीआरएसकडून स्पष्टीकरण

नवशक्ती Web Desk

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावर आले आहेत. येताना त्यांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि नेत्यांना सोबत आणलं आहे. केसीआर हे आपल्या बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रात प्रसार करत आहेत. याचा काँग्रेसह इतर पक्षांनी देखील धसका घेतला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर त्यांच्या मांसाहार भोजनाजी बाब पुढे करुन निशाणा साधला आहे. बीआरएसने मात्र मिटकरी यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत केसीआर व त्यांच्या मंत्रिमंडळाने हैदराबादहून पंढरपूरच्या वारीत असताना वाटेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे थांबून मांसाहारी भोजनाचा बेत आखला हा प्रकार शोभनीय आहे का? असा सवाल केला आहे. यावेळी मिटकरी यांनी वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. पंढरपूरला वारीसाठी येताना दहा हजार वेळा विचार करा. पंढरीची वाही पवित्र असून असं वागण्याने अपवित्र करु नका. अशा शब्दात केसीआर यांच्यावर टीका केली होती. यावेळी मिटकरी यांनी मांसाहाराची छायाचित्रे देखील ट्विटरवर शेअर केली आहेत.

बीआरएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी मात्र अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. महाराष्ट्रात केसीआर यांच्या पक्षाचे तुफान आलं असल्याने येथील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांची पोटदुखी सुरु झाली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक चिखलफेक करण्यात येत असल्याचं माणिक कदम यांनी म्हटलं आहे.

मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दहशतवादी हल्ले; भाजप कार्यकर्त्याची हत्या

तेव्हा कुणालाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते; ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

मतदान टक्केवारी जबाबदारी केवळ मतदारांची नाही!