राजकीय

खर्गे किंवा राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार ; शशी थरूर यांची परस्पर घोषणा

प्रतिनिधी

थिरुवनंतपुरम : इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्धार केला असला तरी आघाडीचा सर्वमान्य पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे शिताफीने टाळले असताना काँग्रेस पक्षातील काही नेते मात्र परस्पर पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करीत आहे. यामुळे आघाडीत गोंधळ उडण्याची शक्यताच अधिक वाटू लागली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शशी थरूर यांनी इंडिया आघाडी सत्तेत आली तर आपला पक्ष कदाचित राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे नामांकन देर्इल, अशी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल आर्श्चयकारक लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. जनता एनडीए आणि मित्रपक्षांना सत्तेतून खाली खेचून इंडिया आघाडीला सत्तेत आणेल, अशी आशा शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे.

शशी थरूर अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीतील वे डॉटकॉमचे अनावरण केल्यानंतर अमेरिकेतील व्यावसायिकांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले की, आता आपण थांबून वाट पाहायची आहे. मतमोजणीनंतरचे चित्र रंगवताना ते म्हणाले की, हे आघाडीचे राजकारण आहे. तेव्हा एकदा का निकाल लागले की पक्षांनी एकत्र बसून एक नाव ठरवण्याची गरज आहे. पण माझ्या अंदाजानुसार तो काँग्रेस पक्षाचाच असेल, एकतर राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे. खर्गे झाले तर ते पहिले दलित पंतप्रधान असतील किंवा राहुल गांधी असतील, कारण हा पक्ष कुटुंबाकडूनच चालवला जातो. थरूर हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी आपल्यावर जी जबाबदारी देण्यात येर्इल ती आपण प्रमाणिकपणे पार पाडू, असे विधान देखील यावेळी केले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत