(संग्रहित छायाचित्र)
राजकीय

देशातील जनताच माझी उत्तराधिकारी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

इंडिया आघाडीत घराणेशाही असून ती जातीयवादीही आहे, आघाडीतील सर्व घटक पक्ष त्याचे तंतोतंत प्रदर्शन करतात, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चढविला.

Swapnil S

महाराजगंज/मोतिहारी : इंडिया आघाडीत घराणेशाही असून ती जातीयवादीही आहे, आघाडीतील सर्व घटक पक्ष त्याचे तंतोतंत प्रदर्शन करतात, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चढविला. माझा कुणीही उत्तराधिकारी नाही, देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे, असेही मोदी म्हणाले.

बिहारच्या महाराजगंज आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. लोकसभेचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील, तेव्हा विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का बसणार आहे, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. राजद-काँग्रेसने बिहारला खंडणीखोर म्हणून प्रसिद्ध केले. पंजाब, तेलंगण आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये या पक्षांच्या नेत्यांनी बिहारमधील जनतेबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली तरी काँग्रेसचे शाही कुटुंब त्याबद्दल अवाक्षरही बोलले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

तुमचे मत पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी

तुमचे मत केवळ स्थानिक खासदाराला निवडून देण्यासाठी नाही तर तुमच्या पंतप्रधानांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून ते व्होट जिहादमध्ये जे सहभागी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी काँग्रेसला घटनेत बदल करावयाचा आहे, असा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Mumbai : लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला ४ लाखांची भरपाई; उच्च न्यायालयाचा मध्य रेल्वेला दणका

Mumbai : ‘आराम’ हॉटेलचे अस्तित्व धोक्यात? रहेजाकडून कॅपिटल सिनेमाचे संपादन; जागा रिकामी करण्याच्या ऑफर

दादर स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म; पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा विस्तार, मध्य रेल्वेचा पश्चिम रेल्वेकडे जमिनीसाठी पाठपुरावा