राजकीय

काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण - मोदी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण आहे. या निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लगावला.

Swapnil S

फुलबनी (ओदिशा) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण आहे. या निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लगावला. फुलबनी येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत मोदी म्हणाले की, ओदिशात ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होणार आहे. ओडिया भाषा व संस्कृती जाणणाऱ्यांना भाजप मुख्यमंत्री पदी बसवेल. नवीन पटनायक अनेक वर्षे ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत. मी नवीन पटनायकांना आव्हान देतो की, त्यांनी कागद हातात न घेता सर्व जिल्हयांची नावे सांगावीत. जर मुख्यमंत्री तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगू शकत नसतील, तर ते तुमचे दु:ख कसे दूर करणार असा प्रश्न मोदी यांनी विचारला.

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली