राजकीय

काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण - मोदी

Swapnil S

फुलबनी (ओदिशा) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५० जागा मिळणे कठीण आहे. या निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू शकणार नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लगावला. फुलबनी येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत मोदी म्हणाले की, ओदिशात ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होणार आहे. ओडिया भाषा व संस्कृती जाणणाऱ्यांना भाजप मुख्यमंत्री पदी बसवेल. नवीन पटनायक अनेक वर्षे ओदिशाचे मुख्यमंत्री आहेत. मी नवीन पटनायकांना आव्हान देतो की, त्यांनी कागद हातात न घेता सर्व जिल्हयांची नावे सांगावीत. जर मुख्यमंत्री तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगू शकत नसतील, तर ते तुमचे दु:ख कसे दूर करणार असा प्रश्न मोदी यांनी विचारला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस