क्रीडा

आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलग तिसरा विजय; जेमिमाह रॉड्रिग्ज प्लेअर ऑफ द मॅच

विजयासाठी १७९ धावांचा पाठलाग करताना यूएईला २० षट्कात चार बाद ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली

वृत्तसंस्था

बांगलादेशमध्ये सुरू असलेला आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये मंगळवारी भारताने संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) १०४ धावांनी पराभव केला. ४५ चेंडूत ७५ धावा करणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्जला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. तिने दुसऱ्यांना हा पुरस्कार पटकाविला. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची अनोखी हॅट‌्ट्रिक लगावली आहे.

विजयासाठी १७९ धावांचा पाठलाग करताना यूएईला २० षट्कात चार बाद ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजेश्वरी गायकवाडने २० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट‌्स मिळविल्या; तर आठ धावांच्या मोबदल्यात एक विकेट मिळविली. एक बॅट्समन धावचित झाली. यूएईच्या काविषा एगोडागे (५४ चेंडूत नाबाद ३०) आणि खुशी शर्मा (५० चेंडूत २९) यांनाच फक्त दोन आकडी संख्या गाठण्यात यश मिळाले. अन्य फलंदाजांना प्रभाव पाडण्यात अपयश आले.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने डावाची सुरुवात निराशाजनक झाली. शभ्भिनेनी मेघना (१२ चेंडूत १०) आणि रिचा घोष (१ चेंडूत ०) या लवकर बाद झाल्या. त्यानंतर पाचव्याच षट्कात दयालन हेमलता (४ चेंडूत २) धावबाद झाली. अवघ्या १९ धावांतच तीन फलंदाज बाद झाल्या. त्यानंतर मग दीप्ती शर्मा (४९ चेंडूत ६४) आणि जेमिमाह यांच्यात (४५ चेंडूत नाबाद ७५) १२९ धावांची दमदार भागीदारी झाली. या दोघींच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षट्कांत पाच गडी गमावत १७८ धावा केल्या.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती