क्रीडा

महाराष्ट्राच्या अर्जुनवीरांचा गौरव

मुंबईतील विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे तिरंदाजीतील तारे आदिती स्वामी व ओजस देवतळे यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साताऱ्याची आदिती व नागपूरच्या ओजसने गतवर्षी जागतिक तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

त्याशिवाय मुंबईतील विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. खेलरत्न पुरस्कार विजेती बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी एका ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळत असल्याने ते या सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व पॅरा तिरंदाज शीतल देवी यांचाही यावेळी अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदा २६ जणांना अर्जुन, ५ जणांना द्रोणाचार्य, तर ३ जणांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी