क्रीडा

महाराष्ट्राच्या अर्जुनवीरांचा गौरव

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे तिरंदाजीतील तारे आदिती स्वामी व ओजस देवतळे यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साताऱ्याची आदिती व नागपूरच्या ओजसने गतवर्षी जागतिक तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

त्याशिवाय मुंबईतील विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. खेलरत्न पुरस्कार विजेती बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी एका ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळत असल्याने ते या सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व पॅरा तिरंदाज शीतल देवी यांचाही यावेळी अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदा २६ जणांना अर्जुन, ५ जणांना द्रोणाचार्य, तर ३ जणांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा