संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

विराटने विश्वचषकात सलामीला येणे जोखमीचे: हरभजन

Swapnil S

नवी दिल्ली : विराट कोहली टी-२० विश्वचषकात सलामीला आल्यास ते जोखमीचे ठरू शकते. तो भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावरच योग्य आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने नोंदवले.

२ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा व विराटने सलामीला यावे, अशी मागणी काही माजी क्रिकेटपटू तसेच चाहते करत आहेत. विराटने यंदा बंगळुरूकडून सलामीला येत ७४१ धावा केल्या. यामध्ये ५ अर्धशतके व १ शतकाचाही समावेश होता. “विराटने भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर नेहमी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो सलामीला यशस्वी होत असला, तरी टी-२० विश्वचषकात तो तिसऱ्या क्रमांकावरच येणे भारतासाठी सोयीचे ठरेल. तो परिस्थितीनुसार खेळून संघाला सावरू शकतो तसेच आक्रमणही करू शकतो. त्यामुळे विराटच्या स्थानाशी भारताने कोणतीही जखम पत्करू नये,” असे ४३ वर्षीय हरभजन म्हणाला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस