एक्स @BCCI
क्रीडा

उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका? आज होणार स्पष्ट, बघा कसे असेल सेमीफायनलचे समीकरण

ICC Champions Trophy 2025 : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आधीच दाखल झाले असून आजच्या सामन्यातील विजेता संघ अ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. दुसरीकडे ब गटाचे चित्र आधीच स्पष्ट झालेले आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यातील निकालानंतर ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिकाविरुद्ध...

Krantee V. Kale

रविवारी अर्थात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी लढतीतील अखेरचा पण उपांत्यफेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीत आधीच दाखल झाले असून आजच्या सामन्यातील विजेता संघ अ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. दुसरीकडे ब गटाचे चित्र आधीच स्पष्ट झालेले आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यातील निकालानंतर भारताची उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिकाविरुद्ध लढत होणार याचे उत्तर मिळणार आहे.

बघा कसे असेल उपांत्य फेरीचे समीकरण?

ग्रुप A मध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही अजूनपर्यंत एकही सामना पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. रविवारी जो संघ जिंकेल तो अव्वल स्थानावर येईल, तर पराभूत संघ दुसऱ्या स्थानावर असेल. यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन संघ आधीच या गटातून बाद झाले आहेत.

जर सामना अनिर्णित राहिला, तर धावगतीच्या बळावर न्यूझीलंड क्रमवारीत पहिल्या स्थानी राहील आणि भारत दुसऱ्या स्थानी असेल.

भारत-न्यूझीलंड सामन्याच्या संभाव्य निकालांनुसार उपांत्य फेरीची मांडणी अशी असू शकते:

  • जर भारत आजच्या सामन्यात जिंकून ग्रुप A मध्ये अव्वल स्थानी आला तर:

    • भारत वि. ऑस्ट्रेलिया – ४ मार्च, दुबई

    • न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका – ५ मार्च, लाहोर

  • जर न्यूझीलंड आजच्या सामन्यात जिंकून ग्रुप A मध्ये अव्वल स्थानी आला किंवा सामना अनिर्णीत राहिला तर:

    • भारत वि. दक्षिण आफ्रिका – ४ मार्च, दुबई

    • न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया – ५ मार्च, लाहोर

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई