क्रीडा

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ; शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार

पाच दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारली

वृत्तसंस्था

एकामागून एक आयोजित केल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमुळे काही वरिष्ठ आजी-माजी खेळाडू वैतागले आहेत. यादरम्यानच शुक्रवारपासून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करणार आहे. उभय संघांतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून या मालिकेत प्रामुख्याने नव्या तसेच अननुभवी खेळाडूंना संधी देण्याचे भारताचे उद्दीष्ट असेल

पाच दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारली. आता विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितसह विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंना निवड समितीने विश्रांती देण्याचे ठरवले. त्यामुळे आता पर्यायी खेळाडू या संधीचा कशाप्रकारे लाभ उचलतात, हे पाहणे रंजक ठरेल.

धवनच्या साथीने सलामीसाठी डावखुऱ्या इशान किशनला प्राधान्य मिळण्याची शक्यता असून तिसऱ्या क्रमांकावर दीपक हूडाला संधी मिळू शकते. त्यानंतर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा असा भारताचा फलंदाजी क्रम असेल. गोलंदाजीत मोहम्मद सिराज भारताच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. यजुवेंद्र चहल फिरकीची धुरा वाहील. प्रसिध कृष्णा आणि आवेश खान यांच्यापैकी एकालाच अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता आहे.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश