क्रीडा

India vs Bangladesh : भारताचा बांग्लादेशवर ५ धावांनी विजय

या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूत 50 धावा केल्या

वृत्तसंस्था

टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत सुरु भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र काही वेळातच सामन्याला सुरुवात झाली आणि भारताने बांग्लादेशचा ५ धावांनी पराभव केला. भारताची फलंदाजी होऊन भारतानं 185 धावांचं टार्गेट बांग्लादेशसमोर ठेवले होते. दरम्यान बांग्लादेशच्या 7 ओव्हर्स खेळून झाल्यावर पाऊस आला, ज्यानंतर 16 ओव्हर्सचा खेळ कऱण्यात आला. 

उपांत्य फेरीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. त्याने बाद होण्यापूर्वी 8 चेंडूत 2 धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्याला विराट कोहलीने चांगली साथ दिली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतक झळकावले. पण शाकिबने त्याला अर्धशतकानंतर बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. विराटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी घेतले.  

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार