क्रीडा

भारतीय महिला सलग आठव्यांदा अंतिम फेरीत; अष्टपैलु शफालीची दमदार कामगीरी

सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली.

वृत्तसंस्था

सलामीवीर शफाली वर्माने (२८ चेंडूंत ४२ धावा आणि १ बळी) दाखवलेली अष्टपैलू चमक आणि फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात थायलंडचा ७४ धावांनी धुव्वा उडवला. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत भारताची श्रीलंकेशी गाठ पडेल.

सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. शफालीने पाच चौकार व एक षटकार झळकावला. कर्णधार हरमनप्रीत कौर (३० चेंडूंत ३६) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२६ चेंडूंत २७) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर दीप्ती शर्मा (३/७) आणि राजेश्वरी गायकवाड (२/१०) यांच्या फिरकीने कमाल केल्यामुळे थायलंडला २० षटकांत ९ बाद ७४ धावाच करता आल्या. शफालीनेसुद्धा एक बळी मिळवला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर अवघ्या एका धावेच्या फरकाने विजय मिळवला. श्रीलंकेने ६ बाद १२२ धावा केल्यानंतर पाकिस्तानला २० षटकांत ६ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, भारताने सहा वेळा आशिया चषक उंचावला असून, शनिवारी श्रीलंकेला नमवून ते सातव्यांदा असा पराक्रम करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२