क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: शिवम दुबेच्या शतकामुळे मुंबई १७७ धावांनी आघाडीवर

मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती.

Swapnil S

मुंबई : उत्तर प्रदेशने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईनेही पाहुण्यांना चोख उत्तर दिले. शिवम दुबेच्या ११७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील साखळी गटातील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतली आहे.

मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती. मात्र शिवम दुबेने मुंबईचा डाव सावरला. त्याने शम्स मुलाणी याच्यासह सातव्या विकेटसाठी १७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबेने चौफेर फटकेबाजी करताना १३० चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह ११७ धावा रचल्या. त्याला शम्स मुलाणीने चांगली साथ देताना ६३ धावांची खेळी केली. मात्र हे दोघेही माघारी परतल्यावर मोहित अवस्थीने १८ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत नाबाद ३४ धावा फटकावल्या. आता चौथ्या दिवशी अधिकाधिक धावांची भर घालून उत्तर प्रदेशचा डाव लवकर संपुष्टात आणण्यावर मुंबईचा भर असेल.

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

बराक ओबामांच्या ‘Favourite Songs 2025’ यादीत मराठमोळे ‘पसायदान’; जयंत पाटील म्हणाले, "आध्यात्मिक विचार जागतिक पातळीवर...

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन