क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: शिवम दुबेच्या शतकामुळे मुंबई १७७ धावांनी आघाडीवर

मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती.

Swapnil S

मुंबई : उत्तर प्रदेशने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईनेही पाहुण्यांना चोख उत्तर दिले. शिवम दुबेच्या ११७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील साखळी गटातील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतली आहे.

मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती. मात्र शिवम दुबेने मुंबईचा डाव सावरला. त्याने शम्स मुलाणी याच्यासह सातव्या विकेटसाठी १७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबेने चौफेर फटकेबाजी करताना १३० चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह ११७ धावा रचल्या. त्याला शम्स मुलाणीने चांगली साथ देताना ६३ धावांची खेळी केली. मात्र हे दोघेही माघारी परतल्यावर मोहित अवस्थीने १८ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत नाबाद ३४ धावा फटकावल्या. आता चौथ्या दिवशी अधिकाधिक धावांची भर घालून उत्तर प्रदेशचा डाव लवकर संपुष्टात आणण्यावर मुंबईचा भर असेल.

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

१ एप्रिलपासून ATM नियमांत बदल! UPI व्यवहारही मोजले जाणार, फ्री लिमिटनंतर २३ रुपये शुल्क

Mumbai : किरकोळ रिक्षा रांगेतील वादातून मुलींवर जमावाचा हल्ला; मालाडमध्ये ५ जण अटकेत

Iran vs US-Israel War : रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले

World Water Day 2026 : मुंबईकरांना लाखो लिटर पाणी लागणार; १५ वर्षात आणखी ३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज