क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: शिवम दुबेच्या शतकामुळे मुंबई १७७ धावांनी आघाडीवर

Swapnil S

मुंबई : उत्तर प्रदेशने पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेतल्यानंतर ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईनेही पाहुण्यांना चोख उत्तर दिले. शिवम दुबेच्या ११७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील साखळी गटातील सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतली आहे.

मुंबईचे आघाडीचे पहिले पाच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुंबईवर डावाने पराभवाची टांगती तलवार होती. मात्र शिवम दुबेने मुंबईचा डाव सावरला. त्याने शम्स मुलाणी याच्यासह सातव्या विकेटसाठी १७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबेने चौफेर फटकेबाजी करताना १३० चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह ११७ धावा रचल्या. त्याला शम्स मुलाणीने चांगली साथ देताना ६३ धावांची खेळी केली. मात्र हे दोघेही माघारी परतल्यावर मोहित अवस्थीने १८ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत नाबाद ३४ धावा फटकावल्या. आता चौथ्या दिवशी अधिकाधिक धावांची भर घालून उत्तर प्रदेशचा डाव लवकर संपुष्टात आणण्यावर मुंबईचा भर असेल.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त