क्रीडा

भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर फेल; ११७ धावांत भारतीय संघ सर्वबाद

प्रतिनिधी

आज ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा विशाखापट्टणम येथे सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संपूर्ण संघ हा अवघ्या ११७ धावांमध्ये सर्वबाद झाला. यावेळी एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने त्यांनंतर २९ धाव केल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मिशेल स्टार्कने रोहित शर्मा (१३), शुभमन गिल (०), सूर्यकुमार यादव (०) आणि के.एल.राहुल (९) यांना बाद करत ४८ धावांमध्ये ४ बाद अशी अवस्था केली. हार्दिक पांड्याही स्वस्तात तंबूत परतला. ४९ धावांवर निम्मा संघ हा तंबूत परतला होता. एकीकडे विराट कोहली डाव सावरत असतानाच एलिसने त्याची विकेट घेतली आणि भारतीयांचा आशा संपुष्ठात आल्या. यावेळी मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेतल्या, तर शॉन अबॉटने ३ आणि नॅथन एलिसने २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांकडून हा सामना जिंकून मालिका विजय मिळवून देण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमींनी केली आहे.

राज्यात ५५.५४ टक्के मतदान,तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्के मतदान!

Lok Sabha Elections 2024: मतदानादरम्यान मोठा गोंधळ, काँग्रेस नेत्याला मारहाण! बघा VIDEO

कोलकाताच्या खेळाडूंसाठी ‘ते’ २० तास धोक्याचे!

केजरीवालांच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला,न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ!

मोदींनी सांगितले ४०० जागांचे ‘राज’कारण,मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य!