क्रीडा

आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न भंगले

वृत्तसंस्था

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाची घोषणा केली असून आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्नही भंगले आहे.

या संघात युवा फलंदाज इशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दूल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात स्थान मिळू शकलेले नाही. नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडेच सोपविली आहे. सध्या बॅड पॅचमध्ये असलेल्या विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. स्टार फलंदाज के एल राहुलचेही या १५ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धेला मुकणार आहे. तो पाठीच्या दुखण्यातून सावरला नसल्याने आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा