ठाणे

मिलापनगर तलावात ऑक्सिजनअभावी प्राणी मरणावस्थेत

जलप्राण्यांना तलावाच्या तळाशी देखील ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगर तलावातील पाणी खराब/गढूळ झाल्याने मासे, कासव यांना ऑक्सिजन मिळत नसल्याने ते सकाळी सूर्यप्रकाशात सदर तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

जलप्राण्यांना तलावाच्या तळाशी देखील ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत खराब पाण्यामुळे जलप्राण्यांना ऑक्सिजन मिळणे कठीण होत असल्यामुळे जलप्राणी अधिक काळ जिवंत राहू शकत नसल्याची खंत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणसाठी आणि साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असताना देखील या तलावाचे सौंदर्य भकास झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या तलावाचा सुशोभीकरणासाठी आणि साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढण्यात आला नव्हता, या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावरील ऊन प्रकाशात कासवे येऊन बसतील.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश