ठाणे

केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत भाजपचा महापौर होणार

विश्वास आणि समाजकार्य पाहून केडीएसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त मते मिळतील.

वृत्तसंस्था

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि डोंबिवलीकरांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जल्लोष केला. डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या कामाची ही पोचपावती म्हणावी लागेल. यापूर्वीही चव्हाण यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. आपल्यातील एक डोंबिवलीकर आज कॅबिनेट मंत्री झाल्याने खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास होईल असा ठाम विश्वास भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला आहे.

भाजपवर जनतेने ठेवलेला विश्वास आणि समाजकार्य पाहून केडीएसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त मते मिळतील. केडीएमसीत भाजपचा महापौर बसेल आणि कल्याण-डोंबिवलीचा अधिकाधिक विकास भाजप करून दाखवील असेही मत नंदू परब यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त 'घर घर तिरंगा' अंतर्गत देशवासियांनी १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात तिरंगा लावावा अशी विंनती केली. तर डोंबिवली शहरात विद्यार्थी वाहतूक बसेसची मर्यादा ठरवावी. कारण बसेसमध्ये विद्यार्थी असल्याने बसचालकाने याचे भान ठेवावे.

यासाठी डोंबिवली वाहतूक पोलीस उपशाखेत भाजपच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. तरी वाहतूक पोलिसांनी डोंबिवलीतील प्रत्येक शाळेत याबाबत सूचना द्यावी अशी विंनती केल्याचे परब यांनी सांगितले.

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार