ठाणे

उल्हासनगर महापालिकेच्या पतपेढीच्या निवडणुकीत परिवर्तन

प्रतिनिधी

उल्हासनगर महापालिकेच्या पतपेढीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे १३ पैकी ९ उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी महिला वर्गासाठी आरक्षित जागेसाठी समसमान मते पडल्याने नशिबाच्या चिठ्ठीने आशा कजानिया यांच्या बाजूने कौल दिला आहे.

आयटीआय शाळेमध्ये ही निवडणूक पार पडली. यावेळी १३९२ मतदारांपैकी १२४७ पेक्षा अधिक मतदारांनी मतदानात भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे विनोद केणे, अच्युत सासे, दीपक भोये, ब्रह्मचंद करोतिया, नरेश परमार, संदीप बिडलान, अनिल राठी हे विजयी झाले आहेत. भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्ण मतदार जागेवरून एकनाथ पवार, महिला राखीव जागेवर आशा कजानिया विजयी झाल्या आहेत. तर महिला राखीव मधून सिद्धांत पॅनेलच्या जयश्री साठे आणि सर्वसाधारण जागेवर मनोज जाधव हे निवडून आले आहेत. कामगार एकता पॅनलचे दीपक दाभने हे इतर मागासवर्गीय जागेवरून तर विजय बेहनवाल हे मागासवर्गीय जागेवरून निवडून आले आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत