ठाणे

खान्देश एक्स्प्रेसला सफाळे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी

सफाळा येथून पालघर किंवा विरार जाण्यासाठी व सकाळी पालघर किंवा विरारवरून सफाळा येथे येण्यासाठी प्रवाशांची सोय नाही. त्यामुळे या दोन्ही एक्स्प्रेस ट्रेनला जाताना व येताना २ मिनिटांचा थांबा सफाळे स्टेशनला देण्यात यावा अशी विनंती किशोर चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

पालघर : खान्देश एक्स्प्रेसला सफाळे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी नंदूरबार, धुळे, जळगाव, या जिल्ह्यातील नोकरीनिमित्त स्थानिक नागरिकांनी रेल्वे महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे विभागातून खान्देश एक्सप्रेस व एमएमसीटी बीएसएल एसपीएल गाडी नं. १९००३,१९००४ व ०९०५१, ०९०५२ सुरू आहेत. परंतु या गाड्यांना पालघर आणि विरार येथे मध्यरात्रीची वेळ आहे. या वेळेला सफाळा येथून पालघर किंवा विरार जाण्यासाठी व सकाळी पालघर किंवा विरारवरून सफाळा येथे येण्यासाठी प्रवाशांची सोय नाही. त्यामुळे या दोन्ही एक्स्प्रेस ट्रेनला जाताना व येताना २ मिनिटांचा थांबा सफाळे स्टेशनला देण्यात यावा अशी विनंती किशोर चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

सफाळे परिसर बहुतांशी लोक नोकरीनिमित्त खान्देशमधून आलेले आहेत व वास्तव्य करीत आहेत. एमएमसीटी बीएसएल एसपीएल एक्सप्रेस गाडी नं. १९००३,१९००४ व ०९०५१, ०९०५२ ला पकडण्यासाठी मध्यरात्री पालघर किंवा विरार रेल्वे स्टेशन गाठावे लागते.

विरारवरून डहाणूकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.१५ वाजता असून त्यानंतर सकाळी ५.११ वा. लोकल असून तिथे ६ तासांचा गॅप आहे. त्या दरम्यान पोहोचण्यासाठी एकही ट्रेनची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून खान्देश व मुंबई एक्स्प्रेसला सफाळा येथे थांबा दिल्यास सफाळे परिसरातील लोकांची गैरसोय होणार नसल्याचे किशोर लीलाधर चौधरी यांनी बोलताना सांगितले.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन; कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल, १ तास लोकलसेवा विस्कळीत

ऑनलाइन बेटिंग प्रकरण : शिखर धवन आणि सुरेश रैनाला ED चा दणका; ११.१४ कोटींची मालमत्ता जप्त

बुलढाणा हादरले! दारूच्या नशेत मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशी समितीची स्थापना

बिहारमध्ये तणाव वाढला! उपमुख्यमंत्री विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; RJD वर आरोप करत म्हणाले - “यांच्या छातीवर बुलडोझर..."