ठाणे

हवामान खात्याच्या इशाऱ्याने मासेमारी नौका परतल्या; १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा

वृत्तसंस्था

रायगडसह राज्याला ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी सुट्टी घेतली, तरी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठीकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने मुरुडमध्ये सर्वाधिक १६१ मि.मि.पाऊसपडून उच्चांक गाठला होता. आता बहुतांशी जिल्ह्यात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे‌. या इशाऱ्यानंतर बहुतांश मासेमारी नौका परतू लागल्या आहेत. उभी पिके आडवी झाल्याने शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असून शासनाच्या संबंधित खात्याकडून पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे.

परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला लेट मार्क लागला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सह विदर्भातील जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका परतु लागल्या आहेत. शेतातील उभे पीक या पावसामुळे बहुतांश ठिकाणी आडवी होवुन नुकसान झाले असल्याने शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली असून शासनाच्या संबंधित खात्याकडून नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी जोर धरत आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया