संग्रहित छायाचित्र
ठाणे

गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे - सुप्रिया सुळे

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे.

Swapnil S

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. नागरिकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे. पोलिसांनी या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. “अशा नराधमांना लोकांसमोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचे नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असे वागण्याची भीती वाटली पाहिजे. कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे. हात लावणे तर दूरची गोष्ट, पण पाहतानादेखील दहा वेळा विचार केला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक