संग्रहित छायाचित्र
ठाणे

गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे - सुप्रिया सुळे

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे.

Swapnil S

बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे अतिशय गंभीर आणि संतापजनक आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. नागरिकांचा रोष अतिशय योग्य असून गृहखात्याने त्यांच्या संतापाची दखल घेण्याची गरज आहे. पोलिसांनी या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. याशिवाय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. “अशा नराधमांना लोकांसमोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचे नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असे वागण्याची भीती वाटली पाहिजे. कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे. हात लावणे तर दूरची गोष्ट, पण पाहतानादेखील दहा वेळा विचार केला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे ब्राह्मणीकत्व

दिवाळीऐवजी दिवाळं निघालं...