ठाणे

कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर

Swapnil S

वसई : मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन हे महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण हे ५७.४९ टक्के एवढे आहे. यंदा दीड दिवसांचे (५८.३९ टक्के), पाच दिवसांचे (६६.३४ टक्के) आणि गौरी-गणपती (५८.१८ टक्के) आदी विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले.

महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांनी सातव्या दिवशीही प्रतिसाद दिला. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन (५७.४९ टक्के) कृत्रिम तलावात झाले. यंदा महापालिकेकडून विसर्जनासाठी सर्वाधिक म्हणजे १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला