ठाणे

कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले.

Swapnil S

वसई : मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन हे महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण हे ५७.४९ टक्के एवढे आहे. यंदा दीड दिवसांचे (५८.३९ टक्के), पाच दिवसांचे (६६.३४ टक्के) आणि गौरी-गणपती (५८.१८ टक्के) आदी विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले.

महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांनी सातव्या दिवशीही प्रतिसाद दिला. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन (५७.४९ टक्के) कृत्रिम तलावात झाले. यंदा महापालिकेकडून विसर्जनासाठी सर्वाधिक म्हणजे १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune : धरणांत १४ टक्के पाणीसाठा; पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार

सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट! ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत