ठाणे

कृत्रिम तलावातील विसर्जनात महापालिका अग्रेसर

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले.

Swapnil S

वसई : मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार शहरात कृत्रिम तलावांतील विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनातूनही दिसून आले. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन हे महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण हे ५७.४९ टक्के एवढे आहे. यंदा दीड दिवसांचे (५८.३९ टक्के), पाच दिवसांचे (६६.३४ टक्के) आणि गौरी-गणपती (५८.१८ टक्के) आदी विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले.

महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांनी सातव्या दिवशीही प्रतिसाद दिला. शुक्रवारी शहरात एकूण २ हजार ५६९ मूर्तीचे विसर्जन झाले, त्यापैकी १ हजार ४७७ मूर्तीचे विसर्जन (५७.४९ टक्के) कृत्रिम तलावात झाले. यंदा महापालिकेकडून विसर्जनासाठी सर्वाधिक म्हणजे १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला : मुख्यमंत्री; कोण कोण त्याच्याकडे जायचे याचे पुरावेही हाती; कोर्टात उद्या करणार हजर

अशोक खरात प्रकरणाने राजकीय खळबळ!

आजचे राशिभविष्य, २३ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळचे पहिले २ तास कसे घालवावेत? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला; एनर्जी आणि फोकस वाढवणारा परफेक्ट दिनक्रम जाणून घ्या