प्रातिनिधिक फोटो
ठाणे

हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल, अतिवृष्टीचा इशारा अन् शाळेला सुट्टी वाया गेली

हवामान खात्याने दिलेल्या रेड आणि ऑरेंट अलर्टमुळे मुंबई, ठाणे आणि रायगडातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टीचे आदेश देण्यात आले होते; मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरत सकाळी लख्ख उन पडल्याने सर्वांचीच निराशा झाली;

Swapnil S

ठाणे : हवामान खात्याने दिलेल्या रेड आणि ऑरेंट अलर्टमुळे मुंबई, ठाणे आणि रायगडातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टीचे आदेश देण्यात आले होते; मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरत सकाळी लख्ख उन पडल्याने सर्वांचीच निराशा झाली; मात्र चाकरमान्यांनी सुटकेचा श्वास घेत आपली कार्यालये गाठली. दरम्यान, मंगळवारी ठाण्यात दिवसभर अवघ्या ८.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने त्या त्या जिल्हा प्रशासनाने आदल्या रात्रीच शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिले. त्यानुसार शाळांनाही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली; मात्र दिवस उजाडताच आकाश काहीसे ढगाळ, तर काहीसे निरभ्र होत दुपारपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ, टीडीआरएफच्या टीम आपत्तीचा सामना करण्यासाठी तैनात ठेवल्या होत्या; मात्र अतिवृष्टीचा इशारा फोल ठरून दिवसभर पावसाने उघडीप घेतली, तर दुपारनंतर पावसाची संथ रिपरिप सुरू झाली. उकाडयाने हैराण झालेल्या ठाणेकरांना सुखद गारवा मिळाला. दरम्यान दुसऱ्या दिवशी हवामान खाते, आपत्ती विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पावसाचा अंदाज न आल्याने चाकरमान्यांसह सर्वच जण आपल्या दैनंदिन कामाला लागले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश