प्रातिनिधिक छायाचित्र 
ठाणे

भिवंडीतील वाहतूककोंडीला बांधकाम विभाग जबाबदार; खासदार सुरेश म्हात्रे यांचा आरोप

मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी-ठाणे, भिवंडी-कल्याण, भिवंडी-वाडा व मानकोली-अंजुरफाटा चिंचोटी या महामार्गांबरोबरच शहरातील अंजुरफाटा धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने या सर्वच मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

Swapnil S

भिवंडी : मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी-ठाणे, भिवंडी-कल्याण, भिवंडी-वाडा व मानकोली-अंजुरफाटा चिंचोटी या महामार्गांबरोबरच शहरातील अंजुरफाटा धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने या सर्वच मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. भिवंडीतील ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सतत दोन दिवस रस्त्यावर उतरले होते. भिवंडीत सतत होणाऱ्या या वाहतूककोंडीला सार्वजनिक बांधकाम विभागासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व त्यांच्या अखत्यारित काम करणारे ठेकेदार जबाबदार आहेत, असा आरोप खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे.

सोमवारी खासदार बाळ्या मामा यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडीतील वाहतूककोंडी समस्येबाबत मानकोली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत बाळ्या मामा यांनी थेट अधिकारी व ठेकेदारांवर आरोप करत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

खारेगाव ते वडपा रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अधिकाऱ्यांचा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष नाही. ठेकेदार मनमर्जीने काम करत असून कामाच्या दिरंगाईने व अर्धवट कामांमुळे या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.

अधिकारी नेहमी पावसाचे कारण पुढे करून वेळ मारून नेतात मात्र जेव्हा पाऊस नसतो तेव्हा संबंधित अधिकारी व कर्मचारी रस्त्याच्या कामाच्या दुरुस्ती ठिकाणी का उपस्थित नसतात, ठेकेदारांवर नियंत्रण का ठेवत नाहीत, असा सवाल यावेळी खासदार बाळ्या मामा यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केला असून, रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याच्या व रस्त्यांची अर्धवट कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार