ठाणे

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली!

विवियाना मॉल मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सुटकादेखील झाली.

प्रतिनिधी

विवियाना मॉल मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची ठाणे कोर्टाकडून जामिनावर सुटकादेखील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली करण्यात आल्याची बातमी समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी विनयकुमार राठोड यांची परिमंडळ ५ मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी विनयकुमार राठोड यांचे नाव घेत आपल्या अटकेसाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, असं म्हटले होते. विनयकुमार राठोड यांची अशी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले होते की, "ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही."

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार