ठाणे

ठाणेकरांची नवीन इलेक्ट्रिक बसेसची प्रतीक्षा कायम; किमान महिनाभराचा विलंब

पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेतून ठाणे परिवहनला एकूण १०० नवीन बस मिळणार आहेत. यामध्ये ९ मीटर लांबीच्या ६० आणि १२ मीटर लांबीच्या ४० वातानुकूलित बसचा समावेश आहे. मात्र...

Swapnil S

ठाणे : ठाणेकरांच्या गारेगार व पर्यावरणपूरक प्रवासाच्या आशा आणखी काहीकाळ लांबल्या आहेत. पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेंतर्गत ठाणे परिवहन सेवेला मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील २५ इलेक्ट्रिक बसेस तांत्रिक अडचणींमुळे अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे या बसेस दाखल होण्यासाठी किमान महिनाभराचा विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यातील वाढती लोकसंख्या आणि जुन्या, नादुरुस्त टीएमटी बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर नेहमीच टीका होत असते. नागरिकांचा प्रवास सुखकर आणि प्रदूषणविरहित करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा निर्णय घेतला.

पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेतून ठाणे परिवहनला एकूण १०० नवीन बस मिळणार आहेत. यामध्ये ९ मीटर लांबीच्या ६० आणि १२ मीटर लांबीच्या ४० वातानुकूलित बसचा समावेश आहे. या बसेस मार्च अखेरीपर्यंत दाखल होणे अपेक्षित होते; मात्र आधी जुलैपर्यंत आणि आता पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे त्यात विलंब झाला आहे. सध्या या बसेसची तांत्रिक दुरुस्ती व पुन्हा परीक्षणाचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतरच त्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील. या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, सुधारित आणि पर्यावरणस्नेही बससेवेची प्रतीक्षा ठाणेकरांना अद्याप कायम राहणार आहे.

७५ हजार रुपयांची बचत

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत आधीच १२३ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून, त्या घोडबंदर-बोरीवली, ठाणे-खिडकाळी आदी मार्गांवर धावत आहेत. या वातानुकूलीत बसमुळे डिझेल बसच्या तुलनेत मोठी बचत होते. एका इलेक्ट्रिक बसमुळे दररोज सुमारे २५ रुपये प्रति किमी, म्हणजेच महिन्याला जवळपास ७५ हजार रुपयांची बचत ठाणे परिवहनची होत आहे.

Mumbai : मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; 'या' ठिकाणी मिळणार त्वरित मदत

Thane : पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा आधार; उन्हाळ्यात कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या वापराचा निर्णय

लाडकी बहीण योजना : e-KYC मुदत वाढली, पण सर्वांसाठी नाही; फक्त 'या' महिलांनाच मिळणार संधी, संकेतस्थळावर दिला स्पष्ट संदेश

Mumbai : थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस...अन्यथा कायदेशीर कारवाई; डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा

ज्येष्ठांच्या पालनपोषणाचा कायदा म्हणजे मालमत्तेतून बेदखल करण्याचा पर्याय नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा