ठाणे

आज ‘श्रीमलंगगड यात्रे’च्या उत्सवाला सुरुवात; सुरक्षा व्यवस्थेसाठी १२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त

इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने नटलेली श्रीमलंगगड यात्रा यंदाही भाविकांसाठी भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.

Swapnil S

उल्हासनगर : इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने नटलेली श्रीमलंगगड यात्रा यंदाही भाविकांसाठी भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविक या पवित्र दिवशी भगवान मलंगनाथाच्या दर्शनासाठी गड चढणार आहेत.

दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने १२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ४ डीसीपी, १० एसीपी, १२ पीआय, ३८ एपीआय आणि पीएसआय, ६०८ पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड तसेच एसआरपीएफ आणि रॅपिड फोर्सच्या तीन तुकड्या यावेळी सुरक्षेसाठी सज्ज असतील. यात्रेचा मुख्य दिवस १२ फेब्रुवारी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली श्रीमलंगगड यात्रा आजही भव्य स्वरूपात साजरी होत असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. श्रीमलंगगड यात्रा ही केवळ धार्मिक यात्राच नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. माघी पौर्णिमेच्या शुभदिनी श्रीमलंगनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गड चढतात . ही यात्रा हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही प्रतीक मानली जाते, कारण येथे दोन्ही धर्मांचे भाविक श्रद्धेने सहभागी होतात. यात्रेचा सोहळा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मात्र, मुख्य दिवस १२ फेब्रुवारी असल्याने या दिवशी भाविकांकडून यात्रेचा शिखरबिंदू गाठला जाणार आहे.

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

राज्यात आणखी ८ स्वयंचलित वाहन चाचणी मार्ग; RTOमध्ये व्हिडीओ आधारित मूल्यांकन यंत्रणा

‘नारीशक्ती’ पणाला! ‘आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान, दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार

नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच मुख्य सूत्रधार; २० दिवसांपासून फरार, सात जणांना अटक, तपासात धक्कादायक माहिती