ठाणे

अंबरनाथमधील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक

अंबरनाथमध्ये शनिवारी दुहेरी हत्याकांड झाले होते. ज्यात सूरज परमार आणि सुरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती.

Swapnil S

उल्हासनगर : अंबरनाथमधील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा सोसायटी आहे. येथे शनिवारी २ तरुणांचा मृतदेह सापडला होता, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास करत ३ आरोपींना अटक केली आहे.

अंबरनाथमध्ये शनिवारी दुहेरी हत्याकांड झाले होते. ज्यात सूरज परमार आणि सुरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती. या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, घटनेतील आरोपी चंद्रशेखर बिराजदार यांच्या घरा समोरील पाण्याची मोटर चोरी करताना चंद्रशेखर यांनी बघितले आणि त्यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि दोघांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ज्यात त्यांचा अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिराजदार, विठ्ठल बिराजदार आणि अजित राठोड या तिघांना अटक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन