ठाणे

अंबरनाथमधील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक

Swapnil S

उल्हासनगर : अंबरनाथमधील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा सोसायटी आहे. येथे शनिवारी २ तरुणांचा मृतदेह सापडला होता, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास करत ३ आरोपींना अटक केली आहे.

अंबरनाथमध्ये शनिवारी दुहेरी हत्याकांड झाले होते. ज्यात सूरज परमार आणि सुरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती. या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, घटनेतील आरोपी चंद्रशेखर बिराजदार यांच्या घरा समोरील पाण्याची मोटर चोरी करताना चंद्रशेखर यांनी बघितले आणि त्यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि दोघांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ज्यात त्यांचा अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिराजदार, विठ्ठल बिराजदार आणि अजित राठोड या तिघांना अटक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलावर कारवाई होणार का? पुणे अपघातावर काय म्हणाले फडणवीस?

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

जेवणावरून झाला वाद अन् मित्रावरचं केला कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक 

मुंबईत संथ मतदान का? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिले चौकशीचे आदेश

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण