बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक 
ठाणे

घुसखोर बांगलादेशींमधील दोघांवर बांगलादेशातील हत्या प्रकरणातील वॉण्टेड

नवशक्ती Web Desk

ठाणे : बेकायदा भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पनवेलमध्ये बस स्थानकाजवळ अटक करण्यात आली असून ते बांगलादेशात खून प्रकरणात तेथील पोलिसांना हवे असल्याचे त्यांच्याकडे आढळून आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

अली हाफिज शेख (२७) रबिउल मन्नन शेख (४६) व मेसन किस्लू मुल्ला (२५) अशा तिघांना पनवेलच्या एसटी बसस्थानकाजवळ १८ नोव्हेंबरला पकडण्यात आले होते. ते येथे नोकरीच्या शोधात होते. तिघांवर भारतीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.

त्यांच्या तपासामध्ये जी कागदपत्रे मिळाली, त्याचे भाषांतर केले असता त्यात अली शेख व रबिउल शेख या दोघांवर २९ सप्टेंबर २०२३ रोजी खुनाचा गुन्हा बांगलादेशात दाखल झाला आहे. बांगलादेशातील नरैल जिल्ह्यात कालिया पोलीस त्यांच्याशोधात असल्याचे त्या कागदपत्रांवरून दिसून आले. त्यांना बागलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस