बिझनेस

भाज्यांच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण

मागील तीन-चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

नवी मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. २१ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी सडलेला भाजीपाला काही प्रमाणात तेथेच टाकून दिल्याचे दिसून येत आहे. २२ जुलै रोजी पाऊस ओसरल्यानंतर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये साचलेला कचरा अखेर जेसीबीद्वारे उचलण्यात आला.

दुसरीकडे पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून २२ जुलै रोजी भाजीपाल्याला उठाव नव्हता. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात घसरण झाली. तर किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे चढेच दर होते. पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक देखील खूपच कमी झालेली आहे. २२ जुलै रोजी एपीएमसी मार्केटमध्ये ६०० गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. पण, उठाव नसल्याने भाजीपाल्याच्या किमती २५ ते ३० टक्के कमी झाल्या.

पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब