बिझनेस

भाज्यांच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण

मागील तीन-चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

नवी मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. २१ जुलै रोजी व्यापाऱ्यांनी सडलेला भाजीपाला काही प्रमाणात तेथेच टाकून दिल्याचे दिसून येत आहे. २२ जुलै रोजी पाऊस ओसरल्यानंतर एपीएमसी भाजी मार्केटमध्ये साचलेला कचरा अखेर जेसीबीद्वारे उचलण्यात आला.

दुसरीकडे पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून २२ जुलै रोजी भाजीपाल्याला उठाव नव्हता. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात घसरण झाली. तर किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे चढेच दर होते. पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक देखील खूपच कमी झालेली आहे. २२ जुलै रोजी एपीएमसी मार्केटमध्ये ६०० गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. पण, उठाव नसल्याने भाजीपाल्याच्या किमती २५ ते ३० टक्के कमी झाल्या.

सणासुदीत साखर कडू! दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला; महिन्यात २० रुपयांनी वाढ, शेवया-बत्ताशांचे भावही वाढले

ठाणे-पालघरमध्ये करटुले खातेय भाव; चिकनपेक्षाही महाग, ऐन श्रावणात शाकाहारींच्या खिशाला कात्री

राज्यात महा सीएसआर प्राधिकरण स्थापणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

‘कॅस’ फेरफारप्रकरणी SEBI ची कठाेर कारवाई; शेअर बाजारातील दोन संस्थांचे ₹ ३.६८ कोटी जप्त, सेन्सेक्सच्या क्लोजिंग प्राइसमध्ये नफा कमवल्याचा आरोप

Mumbai : नि:क्षारीकरण प्रकल्पाला विरोध; मनोरीवासीयांचे जोरदार आंदोलन, स्थानिक मासेमारीला धोका निर्माण होण्याची भीती