मुंबई/ठाणे : लिथियम बॅटरीच्या किमतीत कपात केल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती लक्षणीयरीत्या कमी होतील. त्यामुळे ग्राहकांना ते अधिक परवडणारे ठरतील. त्यामुळे ईव्ही क्षेत्राला चालना मिळेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
प्रदूषण हे भारतापुढील सर्वात मोठे आव्हान आहे आणि वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनापासून पर्यायी ऊर्जास्रोतांकडे संक्रमणाची तातडीची गरज आहे, असे गडकरी यांनी सोमवारी सांगितले.
बॅटरी तंत्रज्ञानातील चालू प्रगती ही भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या संक्रमणाची गुरुकिल्ली आहे, असे सांगून ते म्हणाले की, जीवाश्म इंधनावर भारताचे अवलंबित्व हे दोन्ही आर्थिक भार आहे, कारण दरवर्षी २२ लाख कोटी रुपये इंधन आयातीवर खर्च केले जातात आणि पर्यावरणाला धोका आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेचा अवलंब देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
ठाण्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक सायकलच्या शुभारंभप्रसंगी बोलताना मंत्री म्हणाले की, वाढते शहरीकरण लक्षात घेता शाश्वत शहरी वाहतूक पर्याय म्हणून सायकलिंगला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारताच्या वाहन क्षेत्राच्या जलद वाढीने जपानला मागे टाकून २०१४ पासून जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे, असे गडकरी म्हणाले.
२०३०पर्यंत, भारत ईव्ही उत्पादनात जागतिक आघाडीवर असेल. जागतिक वाहन बाजारावर लक्षणीय परिणाम होईल, असे ते म्हणाले.
गडकरींनी लिथियम-आयन बॅटरीच्या किमतीत (आता १०० अमेरिकन डॉलर प्रति केडब्ल्यूएच) तीव्र घसरण झाल्याने ईव्ही अधिक परवडणाऱ्या बनल्या आहेत आणि त्यांना पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या किंमतीच्या पातळीजवळ आणले.
लिथियमची किंमत, जी काही वर्षांपूर्वी १५० अमेरिकन डॉलर प्रति किलोवॅट होती, ती आता जवळपास १०० अमेरिकन डॉलरवर आली आहे. ती आणखी कमी झाली की, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही कमी होतील. त्यामुळे ते सर्वसामान्यांना परवडणारे बनतील, असे ते म्हणाले.