बिझनेस

दुसऱ्या तिमाहीतील मंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर; आरबीआय बुलेटिनमध्ये आशावाद

सणासुदीतील मोठ्या प्रमाणावरील व्यवहारांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे,

Swapnil S

मुंबई : सणासुदीतील मोठ्या प्रमाणावरील व्यवहारांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असा आशावाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंगळवारी बुलेटिनमध्ये व्यक्त केला आहे.

डिसेंबरच्या बुलेटिनमधील ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ वरील लेखात नमूद केले की, जागतिक अर्थव्यवस्था स्थिर वाढ आणि मध्यम किरकोळ महागाईसह लवचिकता प्रदर्शित करत आहे. तर २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी उच्च वारंवारता निर्देशक (HFIs)) सूचित करतात की भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीमधील मंदावल्यानंतर आता सणासुदीच्या काळातील मजबूत खरेदीमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सतत वाढ होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असे त्यात म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने लिहिलेल्या लेखात रब्बीच्या उत्तम पेरणीमुळे शेतीसाठी आणि त्यामुळे ग्रामीण भागातील खरेदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या कालावधीत भारताचा जीडीपी वाढ सात-तिमाहीतील नीचांकी ५.४ टक्क्यांवर आला. तथापि, आरबीआयने म्हटले आहे की, बुलेटिनमध्ये व्यक्त केलेले विचार लेखकांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी