लाईफस्टाईल

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

बर्फासारखं थंड पाणी पिल्यानंतर क्षणभर ताजेतवाने वाटत असलं तरी त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू शकतात, असा इशारा तज्ज्ञ देतात.

किशोरी घायवट-उबाळे

कोणताही ऋतू असला तरी अनेक जण फ्रिजमधील थंडगार पाणी पिणे पसंत करतात. उन्हाळ्यात तर हे प्रमाण अधिक वाढते. पण पावसाळा किंवा हिवाळ्यातही अनेकांना ही सवय सोडवत नाही. बर्फासारखं थंड पाणी पिल्यानंतर क्षणभर ताजेतवाने वाटत असलं तरी त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू शकतात, असा इशारा तज्ज्ञ देतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अतिशय थंड पाणी पिल्याने घशात खवखव, सर्दी-खोकला आणि घशातील सूज वाढण्याची शक्यता असते. काहींना डोकेदुखी किंवा 'ब्रेन फ्रीझ'सारखा त्रास जाणवतो. विशेषतः व्यायामानंतर किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होऊन अस्वस्थता वाढू शकते.

तज्ज्ञांच्या मते, अतिथंड पाणी पचनक्रियेवरही परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने पचनरसांचे कार्य मंदावू शकते, त्यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारखे त्रास उद्भवू शकतात. ज्यांना सायनस, टॉन्सिल्स किंवा आधीपासून पचनासंबंधी समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

याचा अर्थ थंड पाणी पूर्णपणे टाळावे असा नाही, मात्र अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. सामान्य तापमानाचे किंवा कोमट पाणी शरीरासाठी अधिक हितकारक मानले जाते. व्यायामानंतर किंवा उन्हातून आल्यावर काही वेळ थांबून पाणी पिणे आणि दिवसभर पुरेसे पाणी घेण्याची सवय ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

BMC Budget 2026 : श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; मुंबईकरांना काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष

ठाकरे सेना, पवार गट की कॉंग्रेस? राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडीची शक्यता

तपासात सहकार्य करत नसल्याने शीतल तेजवानीला अटक; राज्य सरकारचा दावा; मुंढवाप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

२४ महिन्यांत संपादन न केल्यास, जमिनीचे आरक्षण आपोआप रद्द; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा

Mumbai : स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची उद्या घोषणा; भाजपची ४, शिंदे सेनेची २, तर ठाकरे सेनेची ३ नावे जाहीर