लाईफस्टाईल

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला बनवा 'या' स्वीट डिश; पारंपरिक पदार्थांनी वाढवा सणाची गोडी

गुढीपाडवा हा केवळ सण नसून नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरासमोर उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक असते.

किशोरी घायवट-उबाळे

वसंत ऋतूची चाहूल लागली की सण-उत्सवांची लगबग सुरू होते. सजलेली घरे, उत्साहाने भरलेले वातावरण आणि घराघरांत दरवळणाऱ्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध, हे गुढीपाडव्याच्या सणाचे खास आकर्षण असते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यापासून नववर्षाची सुरुवात होते आणि हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा केवळ सण नसून नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरासमोर उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक असते. या आनंददायी सणात पारंपरिक पदार्थांची मेजवानीही तितकीच महत्त्वाची असते.

गुढीपाडव्याला बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ

पुरणपोळी :

गुळ आणि चणाडाळ यांचे गोड सारण भरून तयार केलेली पुरणपोळी हा गुढीपाडव्याचा सर्वात खास पदार्थ आहे. तुपासोबत खाल्ल्यास तिची चव अधिक खुलते.

श्रीखंड :

दह्यापासून तयार होणारे श्रीखंड हे थंडगार आणि गोड डेजर्ट आहे. उन्हाळ्यात आंब्याचे श्रीखंड अर्थात आम्रखंडही मोठ्या आवडीने खाल्ले जाते.

साबुदाणा वडा :

बटाटा आणि साबुदाण्यापासून बनवलेले खुसखुशीत साबुदाणा वडा हे सणासुदीला खाण्यासाठी उत्तम स्नॅक आहे.

काजू मोदक :

काजू, नारळ किंवा इतर घटकांपासून तयार होणारे मोदक हे महाराष्ट्रातील लोकप्रिय गोड पदार्थ असून हे सणाला विशेष बनवतात.

बटाटा वडा :

मसालेदार बटाट्याचे सारण आणि वरून बेसनाचे आवरण असलेला बटाटा वडा हा चहासोबत खाण्यासाठी परफेक्ट पदार्थ आहे.

नारळाचे लाडू :

नारळ आणि कंडेन्स्ड मिल्कपासून तयार होणारे नारळाचे लाडू हे झटपट बनणारा उत्तम पदार्थ आहे.

कोथिंबीर वडी :

कोथिंबिरीपासून तयार होणारी कोथिंबीर वडी ही पारंपरिक आणि चविष्ट स्नॅक असून सणाच्या मेनूमध्ये वडीला विशेष महत्त्व दिले जाते.

गुढीपाडवा सण हा आनंद, नव्या सुरुवातीचा आणि परंपरांचा संगम आहे. या दिवशी घरच्या घरी हे पारंपरिक पदार्थ बनवून सणाची गोडी अधिक वाढवता येते.

Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway : 'प्रत्येक विकेंडला हीच दशा'; लोणावळ्यात महामार्गावर भीषण कोंडी, प्रवाशांचा उद्रेक

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

राज्याचे तापमान वाढणार; उष्ण व दमट हवामान; विजांसह पावसाची शक्यता