नारळाच्या शेंड्या कचऱ्यात टाकता? थांबा! त्याचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला कदाचित माहित नसतील 
लाईफस्टाईल

नारळाच्या शेंड्या कचऱ्यात टाकता? थांबा! त्याचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला कदाचित माहित नसतील

नारळ फोडल्यानंतर उरलेल्या शेंड्या तुम्ही थेट कचऱ्यात टाकता? थांबा! रोजच्या घरात वापरल्या जाणाऱ्या या साध्या गोष्टीमागे लपलेले काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही त्या कधीच फेकणार नाही.

Mayuri Gawade

भारतीय घरांमध्ये नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पूजा असो किंवा स्वयंपाक, ओल्या नारळाशिवाय अनेक पदार्थ अपूर्ण वाटतात. नारळ फोडल्यानंतर आपण त्याचे पाणी पितो आणि खोबरं वापरतो. मात्र उरलेल्या नारळाच्या शेंड्या बहुतेक वेळा कचऱ्यात टाकल्या जातात.

पण अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये या शेंड्यांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये टॅनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे काही साध्या उपयोगांसाठी त्यांचा वापर केला जातो.

१. गुडघेदुखी कमी करण्यासाठी उपयोग

नारळाच्या शेंड्या जाळून त्याची राख तयार केली जाते. ही राख मोहरीच्या तेलात किंवा जास्वंदीच्या तेलात मिसळून गुडघ्यांना मसाज केल्यास वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते, असे पारंपरिक उपायांमध्ये सांगितले जाते.

२. केसांसाठी नैसर्गिक उपाय

नारळाच्या शेंड्यांची राख खोबरेल तेल किंवा कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून केसांना लावण्याचा पारंपरिक उपाय काही ठिकाणी केला जातो. यामुळे केसांना पोषण मिळण्यास आणि केस मजबूत राहण्यास मदत होऊ शकते.

३. दात स्वच्छ करण्यासाठी

नारळाच्या शेंड्यांची राख आणि सैंधव मीठ एकत्र करून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी काही लोक हा घरगुती उपाय वापरतात. तसेच हिरड्यांच्या सूजेवरही याचा उपयोग होऊ शकतो.

४. त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब

नारळाच्या शेंड्यांचा मऊ धाग्यासारखा भाग आंघोळीच्या वेळी नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरता येतो. यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक स्वच्छ व मऊ वाटते.

५. डास दूर ठेवण्यासाठी

नारळाच्या शेंड्या जाळल्यावर तयार होणारा धूर डास आणि कीटक दूर ठेवण्यासाठी काही ठिकाणी वापरला जातो. कडुलिंबाची पाने टाकून धूर केल्यास त्याचा परिणाम अधिक होऊ शकतो.

महत्त्वाची सूचना

हे उपाय पारंपरिक घरगुती पद्धतींवर आधारित आहेत. त्वचा, दात किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास हे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले