मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंह राव १४ भाषा बोलत होते. त्यांना १४ भाषा शिकण्यासाठी सक्तीच्या शाळेत पाठवले होते का, असा सवाल उपस्थित करत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे अकार्यक्षम मंत्री असून त्यांना नावासाठी मंत्रिपद द्या; मात्र खाते कुठलेही देऊ नका, अशी विनंती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
आहे. आताचे शिक्षणमंत्री अकार्यक्षम असून विद्यार्थी, यांच्यामुळे पालक तणावात आहेत. हिंदी भाषेला विरोध नाही; शिक्षणाच्या प्रवाहात येताच हिंदी भाषा सक्ती हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हिंदी भाषा संदर्भात सुधारित जीआर काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी महायुतीला दिला.