महाराष्ट्र

चारुतासागर यांचे साहित्य अमूल्य ठेवा : आप्पासाहेब खोत ; १४ वे चारुतासागर साहित्य संमेलन संपन्न

प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Swapnil S

सांगली : चारुतासागर यांचे साहित्य हे एक अमूल्य ठेवा असून तोच वारसा नव्या लिहित्या लेखकांनी निरंतर पुढे चालू ठेवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. कवठेमहांकाळ येथे संपन्न झालेल्या १४ व्या चारुतासागर साहित्य संमेलनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी प्रतिभा पोरे यांना राज्यस्तरीय चारुतासागर उत्कृष्ट कथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ लेखक प्रा.यशवंत माळी यांचा अमृतमहोत्सव सोहळ्या निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब खोत म्हणाले, “चारुतासागर यांच्या कथा वाचकाला आजही भुरळ घालतात. त्यांच्या कथा वाचकांच्या मनाला अस्वस्थ करून सोडतात. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या सर्वच कथा या ग्रामीण भागातील सामान्य माणसांचे वास्तव जीवन अचूक टिपून कथेत जसेच्या तसे सांगतात. त्यांची प्रत्येक कथा ही कसरत व दमदार असल्याने ती अधिक प्रभावी झाली आणि वाचकांच्या अभिरुचीस उतरली. या कथा साहित्याची प्रेरणा घेऊन नव्या लिहित्या लेखकांनी चारुतासागर यांची साहित्य परंपरा पुढे चालू ठेवावी.” उद्घाटनपर भाषणात डॉ. जे. डी. म्हेत्रे म्हणाले, “आजच्या युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता वाचन, लेखनाचा छंद जोपासावा.”

मुंबई : रुग्णालयांतील अन्न निकृष्ट निघाल्यास फक्त ₹१००० दंड; BMC च्या टेंडरमधील अटींवर तज्ज्ञांकडून सवाल

Mumbai : मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात ठरला 'हॉटस्पॉट'; सुमारे ३ लाख पर्यटकांची भेट, BMC च्या खात्यात तब्बल...

...तर झाडे तोडण्याची परवानगी मागे घेऊ! मुंबई मेट्रो, GMLR प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावरून सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना फटकारले; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे दिले आदेश

त्या 'जीआर'च्या स्थगितीस नकार; ओबीसी संघटनांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली