File Photo ANI
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला पोहोचले आहेत. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदेंची ही दिल्लीवारी असल्याचे समजते. त्याचसोबत महाराष्ट्रातील विविध मोठे प्रकल्प देखील मार्गी लावायचे आहेत. त्यासंदर्भातही मुख्यमंत्री भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाणार असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीला पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याचे समजते. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. अद्यापही मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे सत्ताधारी शिंदे गट तसेच भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत आले असल्याचे समजते.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत नेमके कोणाला भेटून चर्चा करतात याकडे लक्ष लागले आहे.

मोठ्या प्रकल्पांना केंद्राचे बळ हवे

महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. त्याचसोबत काही मोठे प्रकल्प सुरू करायचे आहेत. त्यासंदर्भात केंद्राचे मोठे पाठबळ लागणार आहे. लोकसभा निवडणुकांना आता वर्षभरापेक्षा कमी कालावधी आहे. त्या आधीच महाराष्ट्रासाठी मोठे प्रकल्प मंजूर करून घेण्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. दिल्लीवारीत या प्रकल्पासंदर्भातही चर्चा होऊ शकते.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर