महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे

लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

नवशक्ती Web Desk

वाशिम : सुरळीत विद्युत पूरवठ्याची मागणी करीत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकाची पेरणी केली. या पिकांना पाण्याची गरज असताना विज वितरण कंपनी पुरेसा विद्युत पूरवठा करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान वीज वितरणच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलु खडसे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा