महाराष्ट्र

वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा

सातारा जिल्ह्यात ३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मंगळवारी, १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीअखेर पर्यंत राबविण्यात येणार आहे.

Swapnil S

कराड : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने चालकांनी वाहतूकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास अपघात टाळता येतात. रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या अंमलबजावणीने तब्बल ४ टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले झाल्याचे प्रतिपादन सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले.

सातारा जिल्ह्यात ३५ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मंगळवारी, १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीअखेर पर्यंत राबविण्यात येणार आहे.या सप्ताहाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी सातारच्या सैनिक स्कूलमधील डहाणूकर हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधिक्षका ऑंचल दलाल, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सैनिक स्कूलच्या विद्यार्थी, नागरिकांनी रस्ता सुरक्षा शपथ घेतली.

सातारा डिलर असोसिएशनचे प्रतिनिधी अभिजित पिसाळ, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी प्रशांत पोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो विमानसेवा सुरू; दिवसातून दोन वेळा प्रवास करता येणार

मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार

वाहतूककोंडीचा ‘अलर्ट’, अपघाताची नोंद; २ भूमिगत मजल्यांसह अत्याधुनिक कमांड सेंटर सुरू,कोस्टल रोडवरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित

Mira-Bhayandar Metro : प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रोचा पहिला टप्पा ३ एप्रिलपासून सुरू