महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट; जळगावमध्ये दगडफेकीत एकाचा मृत्यू

प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा दिवस. अशामध्ये एकीकडे विजयाचा गुलाल उधळत असताना दुसरीकडे हा दिवस जळगावमधील एका गावासाठी कला दिवस ठरला. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांमधील कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे.

जळगावच्या जामनेर तालुक्यात टाकळी गावामध्ये दोन गटात शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्यामधील २८ वर्षाचा धनराज माळी हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता. कार्यकर्त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयातच इतर कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र