महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट; जळगावमध्ये दगडफेकीत एकाचा मृत्यू

आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा दिवस, पण हा दिवस जळगावमधील टाकळी गावाला कटू आठवणीमुळे लक्षात राहील

प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा दिवस. अशामध्ये एकीकडे विजयाचा गुलाल उधळत असताना दुसरीकडे हा दिवस जळगावमधील एका गावासाठी कला दिवस ठरला. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांमधील कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे.

जळगावच्या जामनेर तालुक्यात टाकळी गावामध्ये दोन गटात शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्यामधील २८ वर्षाचा धनराज माळी हा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता. कार्यकर्त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयातच इतर कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन