महाराष्ट्र

जमावाच्या मारहाणीत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जामनेरमध्ये तणाव

जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी बेदम मारहाण केली. घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर जामनेरमध्ये तणाव निर्माण झाला.

Swapnil S

जळगाव : जामनेर येथे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाला संशयावरून काही तरुणांनी बेदम मारहाण केली. घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर जामनेरमध्ये तणाव निर्माण झाला. पोलीस तपासात दहा संशयितांची नावे समोर आली असून, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुलेमान पठाण हा बारावी उत्तीर्ण असून पोलीस भरतीची तयारी करत होता. सोमवारी तो अर्ज दाखल करण्यासाठी जामनेरला आला होता. एका कॅफेत बसला असताना काही तरुणांनी त्याला बाहेर खेचत मारहाण करण्यास सुरुवात केली. बस स्थानकातही त्याला मारहाण झाल्याचे सांगितले जाते.

घरी बेटावद खुर्दला परतल्यावर त्याने पालकांना घटना सांगितली, पण काही वेळातच तो कोसळला. तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर एका समुदायाने जामनेर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन जमाव शांत केला. सुलेमानच्या मृत्यूप्रकरणी वडील रहीमखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार

Chandra Grahan 2026: वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन

WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम

गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती

Navi Mumbai : लालफितीत अडकला DPS फ्लेमिंगो तलाव; शासन निर्णयाअभावी संवर्धन रखडले; प्रशासकीय दिरंगाईचा फटका