महाराष्ट्र

जरंगे पाटलांची प्रकृती स्थिर; प्रशासनाचे लक्ष

प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुधवारी नऊ दिवस झाले अाहेत. उपोषमादरम्यान जरंगे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याकडे प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.

जरंगे यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. सरकारने आत्तापर्यंत दोन वेळा जरंगे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे.

जरंगे यांना डिहायड्रेशन आहे आणि त्यांची क्रिएटिनिन पातळी थोडी जास्त आहे. आम्ही त्यांना इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यास सुरुवात केली आहे, असे जालन्याचे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले. त्यांचे महत्त्वाचे मापदंड ठीक असले तरी, त्याचा रक्तदाब खालच्या बाजूला आहे. इलेक्ट्रोलाइट्स ठीक आहेत आणि त्याच्या हृदयाची गती देखील समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव