महाराष्ट्र

जरंगे पाटलांची प्रकृती स्थिर; प्रशासनाचे लक्ष

प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुधवारी नऊ दिवस झाले अाहेत. उपोषमादरम्यान जरंगे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याकडे प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.

जरंगे यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. सरकारने आत्तापर्यंत दोन वेळा जरंगे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे.

जरंगे यांना डिहायड्रेशन आहे आणि त्यांची क्रिएटिनिन पातळी थोडी जास्त आहे. आम्ही त्यांना इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यास सुरुवात केली आहे, असे जालन्याचे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले. त्यांचे महत्त्वाचे मापदंड ठीक असले तरी, त्याचा रक्तदाब खालच्या बाजूला आहे. इलेक्ट्रोलाइट्स ठीक आहेत आणि त्याच्या हृदयाची गती देखील समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी