महाराष्ट्र

जरंगे पाटलांची प्रकृती स्थिर; प्रशासनाचे लक्ष

प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुधवारी नऊ दिवस झाले अाहेत. उपोषमादरम्यान जरंगे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याकडे प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.

जरंगे यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. सरकारने आत्तापर्यंत दोन वेळा जरंगे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे.

जरंगे यांना डिहायड्रेशन आहे आणि त्यांची क्रिएटिनिन पातळी थोडी जास्त आहे. आम्ही त्यांना इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यास सुरुवात केली आहे, असे जालन्याचे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले. त्यांचे महत्त्वाचे मापदंड ठीक असले तरी, त्याचा रक्तदाब खालच्या बाजूला आहे. इलेक्ट्रोलाइट्स ठीक आहेत आणि त्याच्या हृदयाची गती देखील समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप