महाराष्ट्र

मराठा आरक्षणाला कुणबी समाजाचा विरोध नाही

विश्वनाथ पाटील : जरांगे-पाटील सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोप

नवशक्ती Web Desk

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला दिलेले आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही, असे मत कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे. मनोज जरांगे-पाटील हे सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, असेही विश्वनाथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

विश्वनाथ पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही; ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र, मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल. शासन मनोज जरांगे यांचे उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे, हा ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय आहे. पोलीस कारवाई करून महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची आम्ही विनंती करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक