संग्रहित छायाचित्र एएनआय
महाराष्ट्र

मविआ १८० जागा जिंकेल, महायुतीने विरोधी पक्षनेता ठरवावा: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता कोणाला करायचे याचा विचार भाजपप्रणीत महायुती सरकारने करावा.

Swapnil S

पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता कोणाला करायचे याचा विचार भाजपप्रणीत महायुती सरकारने करावा. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (मविआ) १८० जागा मिळणार आहेत, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी येथे रविवारी व्यक्त केला.

ते म्हणाले की, ‘मविआ’चा दणदणीत विजय झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू, तर ‘महायुती’ सरकारने आपला विरोधी पक्षनेता कोण असेल हे निश्चित करावे. ‘एक देश-एक निवडणूक’ ही संकल्पना कागदावर चांगली दिसते. पण, ती वास्तवाला धरून नाही. सरकारला इतकाच कळवळा असता, तर हरयाणाच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या असत्या. जनतेच्या पैशातून आणखी प्रचार मोहीम राबवली नसती, असा टोला त्यांनी मारला.

लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ने राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. आता विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ चांगलीच कामगिरी करेल. जागावाटपात उमेदवाराची विजयी होण्याची शक्यता पडताळून जागावाटप केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १७ पैकी १३ जागा जिंकल्या. तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला केवळ १७ जागा मिळाल्या, तर भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. ‘मविआ’ला येत्या निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळेल, तर विरोधकांना २८८ पैकी केवळ १००-१२५ जागा मिळतील, असे थोरात यांनी सांगितले.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार