महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तापमानात होणार वाढ; हवामान विभागाने दिला इशारा

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखादेखील पाहायला मिळाला. परंतु, आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये पुन्हा एकदा गरमी वाढणार असून राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या २ दिवसांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली. मात्र त्यानंतर आता राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, विदर्भात पावसानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम