महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तापमानात होणार वाढ; हवामान विभागाने दिला इशारा

राज्यातील तापमान हे ४ ते ६ अंश सेल्सियसने वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखादेखील पाहायला मिळाला. परंतु, आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये पुन्हा एकदा गरमी वाढणार असून राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या २ दिवसांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली. मात्र त्यानंतर आता राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, विदर्भात पावसानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव