महाराष्ट्र

नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आजपासून बेमुदत उपोषण करणार

केंद्रानेही परवानगी दिल्याने आता दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे

प्रतिनिधी

औरंगाबाद आणि उस्मानाबाद याचे नामांतर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली. मात्र आता या निर्णयामुळे राजकारण चांगलेच तापले असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. आजपासून (४ मार्च) जलील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. हा बेमुदत संप किती दिवस सुरू राहील हे सांगता येत नाही, असेही जलील यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. पुढे हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. केंद्रानेही परवानगी दिल्याने आता दोन्ही जिल्ह्यांचे नामांतर करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने एमआयएम आजपासून रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान, आज दुपारी ३ वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

CJP च्या आंदोलनात सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी; जाणून घ्या फायदे आणि वैशिष्ट्ये

Pune : राजगडाजवळ मुंबईतील पर्यटकांची खासगी ट्रॅव्हलर बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला

Mumbai : '१५ हजार लोकांना ठार मारायचं होतं'; मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणात आरोपीची धक्कादायक कबुली