महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर प्रकरणावर राज ठाकरेंनी केली कानउघडणी ; 'या' गोष्टी जबाबदार

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेचा राज ठाकरेंनी निषेध केला असून त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निर्णय घेणे महत्त्वाचे

नवशक्ती Web Desk

"शंभर वर्षांची परंपरा खंडित होऊ नये, त्र्यंबकेश्वरमध्ये प्रथा बंद करणे योग्य नाही". त्याचबरोबर बाहेरच्या लोकांनी यात पडण्याचे कारण नाही. गावातील लोकांना हा निर्णय घ्यायचा आहे. यातून कोणाला दंगल हवी आहे का? जिथे चुकते तिथे हल्लाबोल करणे गरजेचे आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेचा राज ठाकरेंनी निषेध केला असून त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

प्रथा शंभर वर्षे जुनी असेल तर ती खंडित करू नये, बंद करू नये, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे हा गावाचा प्रश्न असल्याने इतरांचा त्याच्याशी काही संबंध नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

या सर्व गोष्टींना सोशल मीडिया जबाबदार आहे आणि त्यावर या गोष्टी पाहायला मिळतात. त्यातून गैरसमज पसरतात. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाहीत, असे सूचक विधान केले.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे