महाराष्ट्र

समुद्रात बुडणाऱ्या १६ तरुणांचे प्राण वाचविण्यात यश

पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स जेटी जवळ ‘सरस्वती’ नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.

Swapnil S

रत्नागिरी : पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील पावस व रनपार या गावातील एकूण १६ तरुण हे मौजमजा करण्यासाठी फिनोलेक्स जेटी जवळ ‘सरस्वती’ नामक एका बोटीने समुद्रात फिरण्यासाठी गेले होते.

समुद्र खवळलेला असल्याने या १६ तरुणांना घेऊन जाणाऱ्या सरस्वती बोटीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने बोट पलटी झाली व सर्व तरुण पाण्यात ओढले गेले. जवळच असणाऱ्या दुसऱ्या एका ‘अल फरदिन’ या बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी तसेच रत्नागिटी पोलीस दलाचे सुरू असलेले ‘सागर कवच’ अभियान दरम्यान बंदोबस्त कामी सिल्वर सन या पायलट बोटीवर तैनात पोलिसांनी सर्वांना तात्काळ मदत देण्यात आली व बुडत असलेल्या १६ तरुणांना वाचवण्यात मदत करण्यात आलेली आहे. १६ तरुणांना समुद्राच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्या सर्व जणांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

तसेच सरस्वती बोट ही पाण्यात बुडलेली आहे.या घटनेचा अधिक तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"